

भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प करणारे महाप्रतापशाली रणधुरंधर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून मुत्सद्दीपणा आणि गनिमी कावा यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य उभारले. जनसामान्यांचा कैवार, उत्कृष्ट प्रशासन आणि गुणवंतांचा आदर ही शिवरायांच्या राज्यकारभाराची त्रिसूत्री होती.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा समजण्यास हे चरित्र अत्यंत उपयुक्त ठरेल.