

अंगणातल्या सोप्यात वडिलांना भेटायला येणारी माणसं,वृत्तपत्रं,पुस्तक यांमुळे माझं आधुनिक जगाशी नातं होतं.त्याच वेळी परसूदारानं आईकडे येऊन आपल्या अडीअडचणी,सुख-दु:ख आणि गाऱ्हाणी मांडायला येणाऱ्या बायाबापड्या आणि पुरूषमाणसं यांच्यामुळं माझं गावाशीही नातं होतं..."असं सांगणार्या अनंतमूर्तींमधल्या लेखकाचा ध्यास आहे तो भारतीय परंपरा,धार्मिकता,जातिव्यवस्था आणि संस्कृती यांचा अर्थ आधुनिक जीवनपद्धतीच्या संदर्भात तपासतं राहणं...मानवी नात्यांची घट्ट वीण आणि नातेसंबंधाचं वैशिष्ट्य्पूर्ण चित्रण यांतून अनंतमूर्तींच्या लेखनाचं वेगळेपण अधोरेखित होतं