

डॉ. बाबासाहबे आंबेडकरांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ओळख समस्त जगाला आहे. त्यांच्या हयातीत त्यांची चळवळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली. त्यांचे विचार समजले उमजले आणि ते बहरले देखील. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर काही वर्षातच समाजाची दशा आणि दिशा बदलली. समाज दिशाहीन झाला. बाबासाहबेांच्या जाण्यानंतर ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व के ले ते निष्फळ ठरले. सध्याच्या परिस्थितीत तर समाज विखुरलेल्या स्वरूपात दिसत आहे. तरुणाईला बाबासाहबे यांची ओळख फक्त एक व्यक्ती म्हणूनच आहे परंतु त्यांनी के लेल्या कार्याचे काय ? बाबासाहबे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचल्याने समाज हित होईल हे सत्य तरुणाई विसरत चालली आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बाबासाहबे असते तर त्यांना काय वाटले असते? भावना शून्य झालेल्या समाज म्हणाला बाबासाहबेांनी काय संदेश दिला असता? याचा प्रवास म्हणजेच बाबा तुम्ही असतात तर ?