

रिंगण, नाळ , कागर , घर बंदक ू बिर्यानी, बापल्योक यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे गीतलेखन करणारे सुप्रसिद्ध कवी गीतकार गझलकार म्हणून नावाजलेले वैभव देशमुख सर यांनी आपल्या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक रसिकांच्या मनात घर के ले. बाजी , बापमाणूस, छोटी मालकीण, गर्जा महाराष्ट्र, आई तुळजाभवानी, कु ण्या राजाची गं तू राणी यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांचे देखील शीर्षकगीतलेखन त्यांनी के ले आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक चित्रपटगीतांना आणि मालिकांच्या शीर्षकगीतांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कारांनी गौरवलेले आहे. कवितासंग्रह ‘तृष्णाकाठ’ला “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ” आणि कु सुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा “विशाखा काव्य पुरस्कार” देखील मिळाला आह