

कृषी-परंपरेतल्या बहु जनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिकसांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्येबहु संख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवढा दिव्य होता, हेच सांगण्यात ज्यांना कृ तकृ त्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकू न खात राहणं आणि त्यालाच ‘खानदानीपण’ म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या- उपरोधाच्या- उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेंव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं.